08 December 2014

स्वयंपाक शक्यतो घरातल्या स्त्रीनेच का करावा ?

No comments :

आजकाल प्रत्येकाचे आयुष्य धावपळीचे खूप झाले आहे.स्त्रिया सुध्दा पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. काही कारणामूळे तिला नोकरी करणे आवश्यक असते. त्यामूळे तिचा दिवसातला बराच वेळ बाहेर जातो.घरी आली की थकून जाते.त्यामुळे काहीवेळा आपल्यातल्या बर्याचजणी स्वयंपाकाच्या बाईचा पर्याय स्वीकारतात,पण पदार्थामधे करणार्या व्यक्तीचे भाव उतरतात असे म्हणतात.   म्हणूनच शक्यतो घरातल्या स्त्रीनेच स्वयंपाक करावा.

म्हणतात की घरच्या स्त्रीने बनवलेले जेवण हे फक्त पोट भरण्यासाठी नव्हे तर त्यातून आरोग्य लाभते ,पोषण लाभते . पण कधी विचार केलाय का कि एखाद्या भाजीत किव्हा पदार्थात मीठ किव्हा तिखट जास्त कमी पडण्याचे कारण काय असेल." तिला स्वयंपाक बनवता येत नाही " नाही हे कारण नसावे आणि नसेलच पण ती कसल्यातरी विचारात गुंतलेली होती जेव्हा ती तो स्वयंपाक करत होती. हो हे अगदी खरं आहे.
ही गोष्ट प्रत्येकानीच वाचावी आणि लक्ष्यात ठेवावी असे मला वाटते
आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा जर आपण टेन्शन किव्हा रागात असलो तर आपण ते टेन्शन आणि राग आपल्या स्वयंपाकात नकळत उतरवत असतो आणि परिणामस्वरूप त्यात मीठ जास्त पडत किव्हा भाजी करपते किव्हा अजून काहीतरी होत फक्त एवढाच नाही तर ज्या व्यक्तीला आपण ते जेवायला घालणार त्याच्या तब्येतीशी हि आपण नकळत पण खेळतो ... तसे होता कामा नाही ,
प्रशंसा कुणाला आवडत नाही आणि निंदा कुणाला आवडते . म्हणून आपण स्वयंपाक बनवताना छान छान विचार करावे , जी भाजी बनवताय त्या भाजीशी बोलावे , त्यात आपले प्रेम आपुलकी काळजी ओतावी , मनापासून स्वयंपाक करावे negative न राहता positivity ने जेवण बनवावे ह्याने नुसतच जेवण tasty नाही तर तुम्ही बनवलेले जेवण रुचकर पौष्टिक आणि त्यांच्या आरोग्याला लाभेल असे बनेल . तेव्हा स्वयंपाक करताना आनंदी राहा फ्रेश राहा वैचारिक राहा पण चांगले विचार करा आणि मगच स्वयंपाक बनवा आणि बघा तुमच्या आप्तेष्टांची तब्येत सुधारू लागेल , तुम्हाला प्रशंसा मिळेल , पदार्थ फसणार नाही आणि तुम्ही एक उत्तम गृहीणी म्हणून परत स्वतःला सिद्ध करू शकाल.

आपण जसे अन्न खातो तसेच आपले विचार, प्रकृती व चेहर्यावरचे भाव बनतात.घरची स्त्री नेहमी आपल्या माणसानी खावे म्हणून प्रेमाने,  आनंदाने,आपुलकीने व जीव ओतून जेवण बनवते .तिचे प्रेम व हातची चव पदार्थात उतरते. त्याचा फायदा ही होतो.सर्वाना नेहमी सकस चवदार अन्न मिळते दवाखाना औषधे दूर रहातात.

म्हणून शक्यतो घरच्या स्त्रीने आनंदाने जेवण बनवावे व असे बनविलेले जेवण खाणार्यानी पण ,'हे माझ्यासाठी माझ्या मायेच्या व्यक्तीनीबनविले आहे' असा विचार करूनच खावे.खूप फायदा होतो.

घरच्या स्त्रीने मस्त चवदार ताजे बनविलेले पदार्थानी,छान सजविलेले ताट पाहीले की पोट भरलेले असले तरी परत एकदा जेवावे असे वाटले पाहीजे ! म्हणून जेवण वाढताना पण आकर्षक पणे ताट मांडावे.

फोटोमधे दाखविले आहे तशा पदार्थाच्य  जागा असाव्यात.डाव्या बाजूचे पदार्थ कमी खावेत.भाज्या उजव्या हातच्या जास्त खाव्यात इ .असे बरेच संकेत असतात.

Presentation is always important !!


No comments :

Post a Comment